राम मंदिर उभारणीसाठी विहिंपने त्यावेळी १९८७ ते ११९२ पर्यंत भारतातून आणि जगभरातून लोकांकडून प्रत्येकी कमीतकमी पन्नास रुपये असे जवळपास ५०० कोटी रुपये जमा केले होते. विहिंपचे प्रमुख अशोक सिंघल होते. वरळी सी फेस ला एका आलिशान फ्लॅटमध्ये ते राहात होते.
त्यांच्यावर हिंदू महासभेचेच एक कार्यकर्ते, लेखक, सावरकरप्रेमी, तसेच पु.ना.ओक यांचे सहकारी कै. जीवन कुलकर्णी यांनी या पैश्याविषयी खुले आम, पत्र लिहून आणि वर्तमानतपत्रातून विचारणा केली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे केस टाकली होती. त्याविषयीचे डिटेल्स माझ्याकडे नाहीत. आता दुर्दैवाने श्री.जीवन कुलकर्णी हे बऱ्याच काळापूर्वी कॅन्सरने वारले.
अशोक सिंघलसुद्धा काही वर्षांपूर्वी वारले. राममंदिर उभारणीसाठी पैसा कोठे गेला? त्याचा हिशोब काय? या विषयी ना कोणी मीडियाने/पत्रकारांनी याची दखल घेतली ना कोणी पक्षांनी, ना कोणी नेत्यांनी.....
एक मात्र खरे त्या रामजन्मभूमी आंदोलनानंतर(बाबरी मशीद पाडल्यानंतर) १९९२ पासून हिंदू आणि मुसलमान यांच्यांत २००२ च्या गोध्य्रा-गुजरात दंगली होईपर्यंत प्रचंड दंगली झाल्या....
दोन्ही बाजूकडचे हजारो लोक मेले, संपत्तीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले
त्याचीच परिणीती भारतात अतिरेकी वादात, बऱ्याच बॉम्बस्फोटात झाली . हकनाक गरीब, दुर्दैवी सर्वसामान्य नागरिक(सर्वच धर्माचे.... अशा प्रसंगी कोणत्याही धर्माच्या निरपराध माणसाचा मृत्यू होतो) मेले..... आणि दोन्ही धर्मांच्या लोकांमध्ये वितुष्ठ निर्माण झाले. भारतीय समाजात प्रचंड ध्रुवीकरण झाले....
याचा फ़ायदा मात्र भाजपाला चिक्कार झाला. १९८५ला केवळ दोन खासदार असलेल्या भाजपाला २९ वर्षात २०१४ साली एकहाती बहुमत २८२ खासदार एवढे संख्याबळ झाले......
लिबरहान आयोग, श्रीकृष्ण आयोग झाले, गोध्य्रा-गुजरात दंगलीवर सुद्धा चर्चा झाली, पण लोकांना काही फरक पडला नाही. उलट मोदी आणि भाजप निवडून आले.
त्यांना आता विकासाच्या नावाखाली सर्वच धर्मीय आणि जातीतील लोकांनी मत दिलीत....
आता तो तरी खराखुरा विकास ते करतात का? हे मात्र जनतेला बघावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment